Thursday 31 December 2015

कविता #8 - कविवर्य - मंगेश पाडगावकर


पावसाच्या सरी बरसाव्यात
तश्या शब्दांच्या बरसणाऱ्या सरीत
ओलचिंब भिजवणारे... मंगेश पाडगावकर

हवेचा गारवा स्पर्शून
प्रेमाचे बंध हळुवार
कवितेतून जोडणारे... मंगेश पाडगावकर

समुद्र आणि आकाशाचे मिलन
ज्या शब्द रचनेतून घडवावे
ते रचनाकार... मंगेश पाडगावकर

मुलांच्या बालमनाला
आनंदित करून
डोलायला लावणारे बालगीत
ते गीत... मंगेश पाडगावकर

प्रेम युगुलांना कवितेतून
ऋणानुबंधात जोडणारे
ऋणानुबंध... मंगेश पाडगावकर

मराठी संस्कृतीत तुरा
मानाचा रोवणारे
महाराष्ट्र गौरव... मंगेश पाडगावकर

भातुकलीच्या खेळामधल्या
राजा राणीला एकत्र आणणारे
शब्दरूपी घर... मंगेश पाडगावकर

निसर्गाशी संवाद साधताना
हळूच लेखणीच्या कुशीत
विसावणारे लेखक... मंगेश पाडगावकर

कवी मनाला
तेवत ठेवून
सतत प्रेरणा देणारे
प्रेरणास्रोत... मंगेश पाडगावकर

चांदण्यासंगे अंतरंगी
ओसंडून वाहणारे
नक्षत्रांचे देणे
ते नक्षत्र... मंगेश पाडगावकर

'माझे जीवन गाणे'
संपूर्ण जीवन प्रवास
सोप्या शब्दांसह मांडून
घेतला जगाचा निरोप
स्वर्गीय कविवर्य... मंगेश पाडगावकर

तुझेच कविमन तुलाच अर्पुनी
वाहतो आदरांजली
पुन्हा यावे या मायभूमी
जीवन गाणे रुपी.


                           - अनुप्रिया सावंत.

Sunday 27 December 2015

प्रत्यक्ष - विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त




प्रत्यक्ष - १० वा वर्धापनदिन विशेषांक - विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त

     'प्रत्यक्ष' ह्या दैनिक वृत्रपत्रास २०१५ च्या दत्तजयंतीच्या शुभमुहर्तावर १० वर्षे पूर्ण झाली. दर दिवशीच्या दैनिक वृत्तांसोबत प्रती वर्षी विशेष लेख असणाऱ्या प्रत्यक्षाची नवीन नवीन संकल्पना काळाच्या बरोबरीने असते. वास्तव्याची ओळख अगदी जवळून करून देणारा प्रत्यक्ष हा एकमेव असा दैनिक आहे, जो इतर राजकीय आणि बिगर राजकीय दैनिकापेक्षा अनेक पटीने वेगळा आहे.

     लहान मुलांच्या बुद्धीला चालना व मनोरंजन देण्यापासून ते अगदी तरुणांपासून थेट ज्येष्ठ लोकांपर्यंत उपयुक्त असे हे वृत्तपत्र आहे. जगातील घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा इत्यंभूत खबरी ह्यात असतातच.

     यंदाच्या ह्या विशेषांकामध्ये  मानवाचे जीवन ते अगदी रहस्यमय आदिवासींच्या जीवनातील वात्सव्य, आंतरराष्ट्रीय पातळीवर चालत असलेल्या उलाढाली, नैसर्गिक आपत्तीचा तिढा, गोल्डन ट्रेनचे भुयार, अण्वस्राहून भयंकर 'अमली पदार्थ', तियांजीन स्फोट, नेपाळचा धरणीकंप, अमानवी व्यापार, 'मोबाईल बँकिंग' घोटाळे, The Catacombs of Paris ( रहस्यमय ठिकाण), नाझ्का लाईन्स(पेरू) - रहस्यमय ठिकाण, विलक्षण जीवसृष्टी, ट्यूब ट्रान्सपोर्ट ह्या आणि अश्या अनेक विषयांवर सखोल माहिती देणारे, जाणीव करून देणारे व वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायला लावणारे विषय आहेत. त्यांची ओळख 
वाचताना आपल्याला प्रत्याक्षामुळे प्रत्यक्ष होत आहे.

     तसेच जॉर्जिया नेशनल अक्वेरिअम, वाळवंटातले मत्सालय, ट्रोपिकल आयलंड रिझोर्ट (जर्मनी) ह्या मानवनिर्मित सौंदर्याची ओळखही ह्यातून होते. फक्त एवढेच न्हवे, तर रोजच्या घडणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चा, उलाढाली ह्यांची वास्तव्यातील घटना कळते. आजच्या जलद युगात अपडेट राहता यावे म्हणून मागच्याच वर्षी 'प्रत्यक्ष'
नववर्ष विशेषांक मार्फत 'सोशल मेडिया इश्यू' अंतर्गत ब्लॉग बनवणे, फेसबुक हाताळणे यांचे अतिशय बारकाईने मुद्दे मांडून तसेच ते सर्वांसाठी उपयुक्त व्हावे, प्रत्यक्षात वापरता यावे अश्या सुयोग्य रचनेत सादर केले होते. ह्याही वर्षी नवीन विषय आणि नवीन भेट ह्या संकल्पनेतून सोशल मेडिया दुनियेतील सफर विस्तृतरित्या पुन्हा एकदा घडवली आहे ती - ई-कॉमर्स आणि पेमेंट्स ह्या विषयाच्या सादरीकरणातून.

     वरील गोष्टी वाचत असतानाच लक्षात येते कि, "विशेष, विलक्षण आणि विक्षिप्त" ह्या प्रत्याक्षाच्या वर्धापन विशेषांकातून अनेक गोष्टी ज्या आपल्या सभोवताली, आपल्या आजूबाजूला, पर्यायी आपल्या विश्वात घडत आहेत, त्यांची जाणीव होते. इंटरनेटच्या दुनियेत फेसबुक, ट्विटर ह्या सारख्या माध्यमातून जगाशी आपण जसे जोडले जात आहोत, तसेच 'प्रत्यक्ष'च्या माध्यमातून डॉक्टर अनिरुद्ध जोशी आपल्याला
काळासोबत चालायला खर तर चालवायलाच शिकवत आहेत.  ह्या वर्षीच्या विशेषांकमध्ये समाविष्ट केलेल्या गोष्टी जेवढ्या भयावह आणि महत्वाच्या आहेत, तेवढ्याच त्या जनमानसात वास्तव्याची कानउघडणी करणारे आहेत. ह्यातून जगातील घडामोडींच्या बाबतीत स्वतःचे व आपल्या आप्तीयांचे संरक्षण करत मानवाने कसे सतर्क राहायला हवे, ह्याची वारंवार प्रचीती येते.

     'दैनिक प्रत्यक्ष' हा आजच्या जीवनाला आणि वास्तविक घडामोडीला साजेशा असा असून त्याचे नियमित वाचन व्यक्तीला वेगळा दृष्टीकोन देते. इतकेच नाही तर स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यात, स्वतःला ह्या धावत्या जगात सतर्क, अपडेट ठेवण्यास मोलाची कामगिरी बजावतो. प्रत्येकाने वाचावे असे हे दैनिक प्रत्यक्ष नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर जगाला माहिती देऊन स्वतःचे वेगळेपण सिद्ध करतोच, पण त्याच बरोबर वाचकांना नेहमीच 'वेगळ' देऊन वास्तव्यातील घटनांच्या शैलींचा छटा बारकाईने पाहण्यास शिकवतो आणि हेच प्रत्यक्षचे वैशिष्ट्य आहे.

    आध्यात्मिक ते वैज्ञानिक ह्यांची उत्तम जोड 'प्रत्यक्ष'मध्ये वेगवेगळ्या स्वरुपात पहायला मिळते. 'प्रत्यक्ष' हा 'आपला मित्र' आहे. काळासोबत चालायचे असेल तर प्रत्यक्षची(आपल्या
प्रत्यक्ष मित्राची) साथ ही हवीच. 
     
     हीच माहिती हिंदीमधून 'प्रत्यक्ष मित्र''अंबज्ञ' प्रत्यक्ष मधूनही मिळते.  
http://www.pratyaksha-mitra.com/ 
     ह्या वेबसाईटला भेट देणाऱ्या प्रत्येकाला ह्या 'प्रत्यक्ष' चे महत्व आजच्या घडीला प्रत्यक्षात किती महत्वाचे आहे? ह्याची जाणीव आपसूकच होते.  आजच्या जगातील ह्या भीषण वास्तव्याला सामोरे जाण्यासाठी, चला तर मग चालूयात 'प्रत्यक्ष' सोबत...
                                                                
                                                                   अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                    पुढील कथा वाचा 

Sunday 13 December 2015

'आपले आरोग्य' - 'आरोग्यम सुखसंपदा'

     आपल्या प्रत्येकाला वाटते आपण हेल्दी असावे. आपण मस्त सुदृढ दिसावे. मग आपण त्यासाठी निरनिराळे प्रयोग स्वतःवर करून पाहतो. अर्थात मीही पाहिलेच होते! पण हे निरनिराळे प्रयत्न डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय घेतल्यामुळे आणि तसेच सतत आपल्या मनाप्रमाणे रिझल्ट न मिळाल्यामुळे आपण कसलाही योग्य विचार न करता डॉक्टरही बदलतो. आरोग्याबाबत सगळ्यांच्याच मनात काळजी ही साहजिकच असते. पण त्या काळजीला योग्य मार्ग आणि योग्य सल्ल्याची आवश्यकताही असतेच. आणि त्यासाठी उत्तम मार्गदर्शकही. नाही का?

      १३ डिसेंबर २०१४, शहाजी राजे क्रीडा संकुल, अंधेरी येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी(एम. डी.) ह्यांचे 'आपले आरोग्य' ह्या विषयावर केलेले उचित आणि अत्यंत उपयोगी असणारे असे बहुपयोगी मार्गदर्शन मिळाले. उत्तम आरोग्य कसे असावे? आणि त्यासाठी आपल्या सवयी आपण हळू हळू का होईना, कसे उत्तम प्रकारे बदलून स्वतः मध्ये उत्तम बदल कसे घडवून आणू शकतो? हे त्यावेळी मनोमन पटले. आणि नुसते पटलेच नाही तर त्यानुसार प्रयासही सुरु झाले. आज १३ डिसेंबर, २०१५ म्हणजे एक वर्षातच डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनाने शरीरातील व मनातील उचित बदल मी स्वतः आणि माझ्यासह माझे कुटुंबही अनुभवत आहे.

      मला केव्हाच सकाळी उठल्यावर ब्रेक फास्ट करणे आवडत नसायचे. त्यामुळे सकाळचा नाश्ता करायची मला सवयच न्हवती. फक्त चहा घेतला की माझी सकाळ सुरु. हेल्थ विषयीच्या मार्गदर्शन करत असताना त्या सकाळच्या नाश्ताविषयीच्या मार्गदर्शनात डॉ. अनिरुद्ध(बापू) ह्यांनी सकाळच्या नाश्त्याचे महत्व कसे आणि काय असते हे पटवून दिले. रात्री झोपल्या नंतरच्या काळापासून ते सकाळी उठे पर्यंतच्या काळात आपल्या पोटी काहीच नसते. त्यामुळे अश्या रिकाम्या पोटी आपण चहा घेतल्यावर आपल्या शरीराला ते हानिकारक असते. सकाळी नाश्ता केल्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी उर्जा तर मिळतेच परंतु त्यामुळे आपल्यात उत्साह राहतो. त्यामुळे आता सकाळी उठल्यावर नुसता चहा घेण्याची सवय बंद होऊन त्यासोबत काही ना काही खाणे असतेच. कधी इडली, कधी ढोकला, कधी ब्रेड बटर कधी आणखी काही ज्यात लेस ऑइल असेल.

     लेस ओइल (कमी तेल) ह्यामुळे तर आणखी एक गोष्ट फार उत्तम घडली. ती म्हणजे, मला जेवणात तेल भरपूर टाकण्याची सवय होती. त्यामुळे प्रश्न पडायचा कि भाजीत तेल आहे कि तेलात भाजी! इथेही त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझे लेस ओइल ही संकल्पना उत्तम जोर घेत आहे. फिश फ्राय करताना डीप फ्राय करण्यासाठी लागणारे भारंभार तेल वापरणे खूपच कमी झाले. माझ्या जेवणात तेल आहे कि नाही हे घरच्यांना कळत तर नाहीच! परंतु जेवणाची चव जराही न बदलता ते जेवण आता घरचे अधिक चवीने खाऊ लागले आहेत. कारण नको असलेले अतिरिक्त तेल शरीरात जाण्यापासून सगळ्यांची सुटका तर झालीच आहे आणि त्याहीपेक्षा आता वजनही न वाढता शरीर सुदृढ दिसत आहे. एकंदरीत हा बदल सर्वांनीच अनुभवला आणि तो प्रत्येकाला आवडला.

     घरात सततचा चहा प्यायला लागणारी मी, आता चहाचे प्रमाण पहिल्यापेक्षा बरेच कमी झाले आहे. त्याहीपेक्षा चहामध्ये किंवा इतर कोणत्याही पदार्थात जिथे साखर लागते, ते आता बाद होऊन त्याची जागा Dextrose ने घेतली आहे. ह्यामुळे साखर पूर्णपणे बंद होऊन वजनही अटोक्यात आहे.

     डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांच्या 'आपले आरोग्य' ह्या मार्गदर्शनामुळे शरीरात आणि मनात जो अवर्णनीय बदल झाला आहे तो मी आणि माझ्या घरचे आम्ही सगळेच अनुभवत आहोत. आणि आम्ही ते एन्जोय करत आहोत. Yes! I Am Healthy. त्यांनी सांगितलेल्या अजूनही बऱ्याच गोष्टी अधिकाधिक जाणून घेऊन आणि त्या अमलात आणून हेल्दी राहण्याचा प्रयास आम्ही सर्वच करीत आहोत. 

 
'आरोग्यम सुखसंपदा' -  http://www.aarogyamsukhsampada.com/ 
  
     ह्या वेब साईट मार्फत अधिक मदत होत आहे.  आरोग्यविषयक उचित आणि निश्चित जाणून घेण्याविषयी डॉक्टर अनिरुद्ध (बापू) जोशी ह्यांनी केलेले मार्गदर्शन हे आयुष्याला नक्कीच 'आरोग्यम सुखसंपदा' असे करणारे आहे. सुंदर आयुष्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने असलेले असे हे मार्गदर्शन तुम्हीही नक्कीच अनुभवून पहा.


                                                         अनुप्रिया सावंत.


मागील कथा वाचा                                              पुढील कथा वाचा 

Wednesday 30 September 2015

ढोल ग्रुप ऑल टाईम धमाल...

आमची मैत्री म्हणजे धम्माल.
सुखात पार्टी घेऊन लुटणारा,
दुखात खांदा देऊन शांत करणारा.
मस्तीमध्ये त्रास देणारा,
लाडाने दुसर्याच नावाने चिडवणारा.
आणि कधी 'ती' दिसली तर...
तर त्याच नावाने चिडवणारा.

चहाची कटिंग आपल्याच खिशातून घेणारा,
हाक मारताना दोन तरी शिव्या घालणारा.
दिसला कुठेही तर हात मिळवून विचारपूस करणारा,
पोरींसमोर मात्र शिव्या देऊन शाईनिंग मारणारा.

कुठचाही प्रवास असो, भन्नाट मज्जा करणारा.
गाण्यांच्या भेंड्या घेत गाण्यांमधून चिडवणारा.
आपण चिडलो कि अजूनच चिडवणारा.
आपण साथ दिली कि (डफली अजून जोरात वाजवणारा) मनोमन सुखावणारा.

नाचा रे करून, कधी बाला डान्स तर कधी...
नागीण डान्स करायला लावून स्वता:ही डुलणारा.
कोणी डान्स करायला नाही बोलला म्हणून...
सूट म्हणून... अक्टिंग करायला लावणारा.

त्याच्या अक्टिंगमध्ये स्वता:च सहभाग घेऊन साथ देणारा.
तरी... ह्यातलेही करायला कोणी ना केलेच, तर.....
तर काय!  गपचूप एकमेकांना खुणवून
टपली, बुक्क्यांची जोरदार तयारी करणारा.

द्या रे ह्याला टपली करून हाणणारे.
लागला का रे तुला कुठे करून 
प्रेमाने दोन शिव्या देऊन जवळ घेणारे.

ह्यात प्रेम असते, आपुलकीची भावना असते.
मैत्रीचा विश्वास असतो, घट्ट मैत्रीची साद असते.

कोण कोणाच्या शिव्या खाईल? 
कोण कोणासाठी उगीचच पनिशमेंट स्वीकारेल?
हीच तर मैत्रीची बात असते,
आपुलकीची जाण असते.
ह्यातच आपली मैत्री खास असते.

नागीण डान्स काय, बाला डान्स काय,
हातावरच खोटं खोटं गिटार घेऊन वाजवणं काय?
सगळं फक्त मित्रांच्या धम्मालसाठी, 
मित्रांच्या एका दिलखुश स्माईलसाठी.

हा खरा मैत्रीचा खटाटोप असतो.
जाणीव असते ह्याची आपल्या दोस्तांनाही,
म्हणून तर त्याचं असतं हक्काने सांगणं.

मैत्री ही मित्रत्वाची जाण असते,
शिव्या घातल्या काय नि रागावलं काय?
गरजेच्या वेळेला धावणारे पाय असते.
संकटातून खेचून काढणारे हाथ असते.
परमेश्वराने दिलेली मैत्रीची देणगीच खास असते.

सारांच्या नशिबी असा दोस्ताना नसतो,
ज्यांच्याकडे असते त्यांना ह्याची जाणीव असते.
कारण ज्यांच्याकडे नसते त्यांना हा टवाळेपण भासतो.

म्हणूनच... कितीही शिव्या खाल्ल्या काय,
कितीही टपल्या पडल्या काय,
नि कोणी कसाही डान्स सांगितला काय!
सगळ काही एक कुटुंब आणि 
कुटुंबातली मेजवानीच असते.
आपल्याकडून आपल्यासाठीच असणारी 
आपल्या मैत्रीची शान असते.

ही शान... हा धागा... आयुष्यात जसा गुंफावा, 
तसा तो अधिकाधिक घट्ट होत जातो.
परमेश्वराने आयुष्या सोबत दिलेली,
अनमोल भेटवस्तूपैकी 'मैत्री' ही त्यातलीच असते.
म्हणूनच आमची मैत्री, आमचा दोस्ताना हा आमचा आहे,
आणि तो आमचा 'खास' आहे,

आम्ही वाजवतो, 
आम्ही नाचतो, 
आम्ही धम्माल करतो.
आमच्या DAD ला आवडते म्हणून.
                                                      - अनुप्रिया आदित्य सावंत.
                                        :D :D :D :D :D
                                                          (ढोल ग्रुप ऑल टाईम धमाल)

ढोल ताशाच्या गजरात...


ना कोणता डिप्लोमा,
ना कोणती डिग्री,
इथे फक्त आणि फक्त 'प्रेम आणि भक्ती'.

बापुची ती एक झलक,
बहार येते सर्वांगांना.

कलेच्या सादेने भिनते,
अनिरुद्ध प्रेम नसनसांतुनी.

ढोल नि ताशा ही नाही नुसती कला,
त्या कलेत आहे अनिरुद्ध प्रेमाची नशा.

ढोल ताशाच्या आवाजात,
आमच्या बाप्पाचे आगमन होता क्षणीच...
बाप्पाचा चेहरा खुले, आनंदाने नाचे.
आमची कला पाहुनी,
बापू आमचा मनोमन सुखावे.

हाच उत्साह, हेच प्रेम,
आम्हाला पदोपदी घडविते.
अनिरुद्ध प्रेमाने,
अनिरुद्धमय होऊनी जाते.

तयार आहोत आम्ही,
पुन्हा त्याच जल्लोषात.
"आम्ही नाचतो,
आम्ही वाजवतो,
आम्ही धम्माल करतो,
आमच्या 'DAD' ला आवडते म्हणून".

                        - अनुप्रिया आदित्य सावंत.

Wednesday 9 September 2015

एक सुजाण नागरिक म्हणून...


    आपली मुले शाळेत जाताना कशी जातात?  कोणत्या मुलांसोबत जातात?  त्यांचे मित्र कोण?  ह्या बाबत पालकांनी जागृत राहणं अत्यावश्यक आहे.  रस्त्यावर ये- जा करणाऱ्या वाहनांना हात दाखवत लिफ्ट मागणे ही शाळेतल्या मुलांची रोजच्या पाहण्यातली गंभीर आणि चिंतेची बाब आहे.  


     शाळेत जायला उशीर म्हणून असो कि मज्जा मस्ती.  सर्रास रस्त्यावर गाड्यांना हात दाखवत लिफ्ट मागतात.  त्यांच्यातल्या बऱ्याच मुलांना लिफ्ट मिळतेही.  लिफ्ट देणारे जास्तीत जास्त बाईक स्वारच असतात.  मुलं सहज त्यांच्याबरोबर निघून जातात.  पण कुठल्याही बाबतीतला विचार न करता त्यांच्याबरोबर निघून जाणे, ही खरी तर त्यांची अल्लड बुद्धी म्हणायची कि आणखी काही.  जे त्या मुलांना लिफ्ट देतात ते माणुसकी म्हणून असो कि भावनिक असो, हे त्यांनीही थांबवायलाच हवे.  कारण त्यांच्या तसे करण्याने मुलांच्या चुकीच्या प्रवृत्तींना कळत-नकळत बळ मिळते.



     बऱ्याच वेळा आपण पेपर मध्ये मुलांच्या अपहरनाबद्दल वाचतो.  पण त्याचा गंभीरतेने ना मूले विचार करत ना पालक.  आपली मूले शाळेत जाताना खरच असा प्रकार करत असतील तर!  ह्या गोष्टीचा विचार फक्त पालक आणि मुलांनीच करावा असेही नाही.  तर प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात आणून देऊन त्यास आळा घालावयास हवा. पालकांनीही स्वतः वेळीच सावध होऊन मुलांनाही ह्याबाबतची जाणीव करून देणे आवश्यक आहे.



     खरं तर प्रत्येक वेळी पालक आणि शिक्षक आपल्या मुलांवर लक्ष ठेवू शकतील असेही नाही.  पण तरीही शक्य तितकं सर्वांनीच ह्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून आपल्या मुलांना ह्या गोष्टीची जाणीव करून देऊन त्यांनाही त्यांच्या स्वतःसाठी तसेच त्यांच्या वर्गमित्रांच्या सुरक्षीततेसाठी चुकीच्या गोष्टींना आळा घालायला शिकवायलाच हवे.



     एक सुजाण नागरिक म्हणून हे आपले कर्तव्यही आहे आणि आपली नैतिक जबाबदारीही आहे.


                                                                                                               अनुप्रिया आदित्य सावंत.

मागील कथा वाचा                                                                                                          पुढील कथा वाचा 

Friday 4 September 2015

कविता #7 - मन म्हणजे...

मन म्हणजे वाऱ्याची झुळूक,
झोक्यासारखी झुलत झुलत उंच आकाशाला भिडणारी.

मन म्हणजे पक्ष्यांचे पंख,
हवे तसे आकाशाला गवसणी घालणारे.

मन म्हणजे एक वेडी आशा,
मनाला सैरभैर करणारी लहर.

मन म्हणजे पाण्यावरचा तरंग,
तरंगातून उसळणाऱ्या उंच उंच लाटा.

मन म्हणजे समुद्र सारखी असणारी भरती ओहोटी,
सुखं-दुःखाचे तरंग, तर कधी लाटांवर स्वैर होत मुक्त संचार करणारे.

मन म्हणजे समुद्रातील शंख-शिंपल्यांची झालर,
कधी मोत्यांत गुंतून जाईल हे न सांगता येणारं.

मन म्हणजे संसारातील भांडी-कुंडी,
जितके धुवून पुसू तितके ते नवं-कोरं.

मन म्हणजे भिंतीतील नाजूक शिल्पकाम,
विचारांच्या माळेत गुंतलेले पण तरीही ठाम.

मन म्हणजे चांदण्या रात्रीचे तारे,
काजवा सारखा चमकणारा प्रकाश,
आठवणींना जागवणारा, लहरींच्या धुंधीत डोलणारा,
फुलांच्या माळेसारखा गुंफणारा, चांदण्यांसारखे हसणारा.

ज्वालामुखीसारखा तळमळणारा,
तर क्षणात मोहाच्या क्षणाला भुलणारा,
कित्येकदा चुकणारा,
तरी स्वतःच स्वतःला सावरणार असं वेडंवाकडं हे आपलच मन.

मन म्हणजे जीवनाचे रहस्यं,
कितीही उलगडा झाला, तरी आयुष्याचा कोडं न सुटणार.
असं हे मन, असं हे आपलच मन.

                  - अनुप्रिया सावंत.

Wednesday 2 September 2015

आठवणीतले क्षण - ढोल प्रक्टिस - दादर ते कर्जत प्रवास...

चला संडे आला, तयारीला लागा.
प्याटर्न लक्षात आहे ना सगळ्यांच्या,
येताना ढोलचा अडीओ ऐकून या रे...
आणि सगळ्यांनी वेळेवर या.

अरे मला सकाळी कॉल कर हा!
तू आधी सकाळचा अलार्म लाव.
भावा, साहेब येणारे काय?
रात्री कोण कोण गेलंय आधीच?
तो तर रात्रीच पोचतो रे... १०० टक्के हजेरी आहे त्याची.
भाई ट्रेन कितीची पकडणार आहेस?
अरे फोन वाजल्यावर उचला रे... झोपू नका फोन बंद करून!
जाताना एकत्र जाऊयात हा!.. .दादरला भेटा.
अरे मेट्रो चालू झाली रे... घाटकोपरला भेटा सगळ्यांनी.

(रात्रीची २:३० वाजता कोठुंबेहून फोन.....)
अरे मित्रा झोपलास का?
सकाळी उठायचय ना लवकर... झोप आता वाजले बघ किती....

(समोरचा फुल झोपेत असताना पुन्हा ३:३० ला तोच फोन....)
काय करतोय रे? झोप नाही येतंय का? अजून झोपला नाहीस?
सकाळी लवकर ये प्रक्टिस करायचीय ढोलची, जरा आता झोप काढ मस्त.
(झोपेची पूर्ण वाट.....)

(सकाळी सगळे गडबडून उठत...)
अरेच्या... वाजले किती? अरे अलार्म वाजलाच नाही? (अलार्म लावलाच नाही)
माझा कॉल वाजून गेला, आता काही खैर नाही.
१० मिनटात ट्रेन सुटेल, चल आंघोळ राहू देत.
अरे आहे तसाच ये बाबा... आम्ही थांबतो पुढे.
तू ये रे निवांत... एक काम कर तिथे जेवायलाच ये ना....
भाई तू येउच नको रे, आज आराम कर घरपे.

(ट्रेन पकडताना....)
अरे तू कुठे आहेस, माझी ट्रेन समोरून गेली रे,
पाठून कोणी येतंय का सोबतीला,
 अरे त्याला कॉल करा, झोपला असेल अजून.
नाही... त्याला आदल्यादिवशीच उचलतात सोबत.
अरे मग कोणी पाठून येतंय का?
तुम्ही अजून झोपा काढा ना ट्रेन आपल्याच आहेत.

(नेरळला उतरल्यावर...)
तू ह्याच ट्रेन मध्ये?
अरे तो पण असेल इथेच बघा त्याला पण...
दोस्त, तू आया...
अरे सब एकही ट्रेन मे???
क्या बात क्या बात, इसे केहते हे याराना....
शाब्बास दोस्ता शाब्बास....

(टमटमचा प्रवास...)
अहो काका घ्या ना एवढेच पैसे असं काय करताय....
आम्ही एवढे जण आहोत सगळ्यांना घ्या एकत्र...
अरे तू दुसरा बघ तो कमी घेतोय का....
या रे इकडे भेटली गाडी.
कसं बसणार एवढे?
अरे ह्याला ढकला रे आत...
आधी ह्या जाड्याला आत पाठवा...
हा बघ! हा बघ... हा बारीक आहे बसवा बारक्यांना आधी.
ए... सरक रे आत.

(गाडी फुल....)
झाली का रे जागा...
कसं वाटतंय... सरक रे जरा...
अरे यहापे जगह देख कितना हे, आरामसे बैठा हे ये तो...
अरे अभंग चालू करा....
अरे हा झोपला गाडीत द्या एक एक...

(टपल्यांचा आवाज.... जणू काही टम टम वाल्या काकांना टाळ्या वाजल्याचा भास.)
:D :D :D :D :D
                                               - अनुप्रिया आदित्य सावंत.

Sunday 30 August 2015

कविता #6 - बालपण...


बालपण कुठेतरी हरवतंय... 
चंदेरी-सोनेरी दुनियाची भुलभुलैय्या भुलवतेय... 

मैदानी खेळ, हसत-खेळत गप्पा, 
त्याची जागा मात्र आता... 
एकांत आणि कॅम्प्यूटरच्या विश्वाने व्यापलीये, 
बालपण कुठेतरी हरवतंय...  

स्वतःचे अस्तित्व हरून, 
मायेची दुनिया भुलवतेय, 
इंटरनेटच्या दुनियेत फिल्मी स्वप्न रंगवतेय. 
बालपण कुठेतरी हरवतंय...  

निरागस कोमल भाव, 
अहंम पणा घेतोय, 
ऐकलकोंडी मन 'मी' पणा मिरवतोय. 
बालपण कुठेतरी हरवतंय... 

मित्र-मैत्रिणींच्या गप्पांत कट्टा कुठेतरी हरवतोय, 
त्याची जागा आता ग्रुप चैट बळकावतोय. 
बालपण कुठेतरी हरवतंय...

स्वतःचे अस्तित्व 'मी' पणात विरतंय, 
आयुष्यं जगण्याची कला चंदेरी-सोनेरी दुनिया भुलवतेय. 
बालपण कुठेतरी हरवतंय...

मनाचा मनाशी चाललंय संवाद, 
कुठेतरी हे गवसतयं, 
बालपण कुठेतरी हरवतंय...

काहीतरी मार्ग स्वतःच काढायला हवा, 
आपल्यातल्या बाल मनाला ओळखून, 
मोकळा श्वास घ्यायला हवा. 
बालपण कुठेतरी हरवतंय...

स्वतःच्या बाल मनाला जगवायला हवं, 
मनाचा मनाशी सुसंवाद घडवायला हवं. 
बालपण कुठेतरी हरवतंय...

हरवलेलं बालपण नव्याने आयुष्यभर जगवायला हवं, 
बालपणाची मज्जा जीवनभर आनंदाने अनुभवायला हवं, 
बालपण कुठेतरी हरवतंय...

                               - अनुप्रिया सावंत.

Thursday 27 August 2015

कोठींबे म्हंटले कि धम्माल.....


कोठींबे म्हंटले कि धम्माल.....
सकाळी उठायचं आणि ट्रेन पकडायला धावायचं.
ज्याची ट्रेन सुटेल त्याने सोबतीला 
कोणाची ट्रेन सुटली का ते पहायचं.

सर्वीकडे फोन फिरवल्यावर भिडू आपल्याला गवसतोच.
अरे तुझी पण ट्रेन मिस करून दोघेही खुशाली कळवतात.

नेरळ गाठल्यावर रमत-गमत सगळ्यांना शोधायचं,
सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्यावर 
रिक्षा जवळ पळत पोहचायचं.

कोण पैसे कमी घेणार म्हणून रिक्षावाल्या काकांना,
हरभराच्या झाडावर चढवायचे,
टम-टम मिळालीSS... या रे सर्वांनी इकडेSS करत दिंडोरा पिटायचा.

जागा पकडण्यासाठी लागलीच धावत पळत सुटायचे.
हुश्श... मिळाली एकदाची टम-टम करुनी प्रवास सुरु खरा कोठींबेचा.
अहा... खरा प्रवास तर धम्माल करायचा...





धडाSमSS.. धूड... अरे डोक्याला लागले... अरे हाताला लागले...
माझी बेग घे रे... मी पडेन रे आता खाली...

आपटत आपटत टम-टम सैरभैर पळे....
साऱ्यांची मस्ती पाहुनी टम-टम ही डुले.

पोचलो रे पोचलो थांबवा इथे गाडी,
तिथला सारा परिसर मनाला हर्षित करे.

कोठींबेचे वातावरणच न्यारे...
पावसाचा मोसम, हवेतला गारवा, हिरवीगार झाडे,
त्यावर बरसलेल्या सरी,
पानांवर पडून दवबिंदू चमके.

ढोलाच्या आवाजात झाडांनीही डूलावे.
हवेतला गारवा पावसाच्या सरी घेउनि धावे.
काय ती धम्माल पावसांच्या सरी सोबत,
जशी आमच्या ढोल-ताश्यांच्या तालाची कमाल.
वाऱ्याच्या झोकात झाडांसोबती डुलुनी,
मनालाही प्रफुल्लीत करून बेभान होऊन नाचावे.

कोठींबेतले प्रत्येक गोष्टी मनाला भुलवणारे,
गोठ्यातले गाई-म्हशी, शेळी, वडाचे उंच झाड,
झाडाभोवती असलेले मैदान
त्यांच्या सभोवताली असलेले कुंपण,
कुंपणात पावसाने भिजलेले छोटे-छोटे गवते,
मखमल पसरल्यागत अवतरलेले.

उंच उंच डोंगर, पावसामुळे आलेली धुके,
गर्द झाडे सोबतीला तिथे दिसलेले नि न दिसलेले,
नानाविध छोटे छोटे प्राणी,
त्यांना पाहण्याची गम्मतच निराळी.

किती छान आहे आमच्या बापूंचे कोठींबे,
जणू एक विशाल देवराज्य अवतरल्यासारखे गोकुळच.
कृष्ण मंदिर, द्वारकामाई, प्रत्यक्षात परमेश्वर वास्तव्य,
झाडे - झुडपे, डोंगर त्यांना मिळालेले निसर्ग सोंदर्य.

मनाला सुखावणारा हवेतला गारवा.
सारं काही विसरून मनाला फक्त...
सुख, आनंद, शांतता देणारं.
असं आमच्या बापूंचे कोठींबे आणि 
बापूंच्या कृपेने आम्ही करत असलेली धम्माल,
सगळं काही खूप मस्तच आहे.

आम्ही नाचतो,
आम्ही वाजवतो,
आम्ही धम्माल करतो,
आमच्या Dad ला आवडते म्हणून.

                                           - अनुप्रिया आदित्य सावंत.

Tuesday 25 August 2015

संगणकीय मेमरी - मेमरी साईज


     संगणकाची मेमरी विशिष्ट परिमाणामध्ये मोजली जाते.  तुम्हाला माहित आहे का?  संगणकाला म्हणजेच आपल्या संगणकाच्या सी.पी.यु.(मेंदू) ला फक्त डिजिटल भाषाच समजते!  ही भाषा विजेचा प्रवाह चालू होणे व तो बंद होणे ह्यावर आधारलेली असते.  

        थोडक्यात सांगायचं तर संगणकाला पुरविलेली माहिती विद्युत पुरवठ्याच्या १ (एक) किंवा ० (शुन्य) ह्या स्थितीत समजली जाते.   ० आणि १ पासून बनलेल्या ह्या विजेच्या भाषेला 'डिजिटल भाषा' असे म्हणतात.

         ० (शुन्य) किंवा १ (एक) म्हणजे १ बिट (Bit) होतो. असे ८ बिट एकत्र येउन १ बाईट (Byte) तयार होतो.

० किंवा १ = १ बिट (Bit)

८ बिट = १ बाईट (Byte)

         त्याचप्रमाणे असे १०२४ बाईट एकत्र केल्यावर १ किलो बाईट (१ KB) तयार होतो.

१०२४ बाईट = १ किलो बाईट (१ KB)

        १ किलो बाईट (१ KB) एकत्र केल्यावर १ मेगा बाईट (१ MB) तयार होतो.

१ किलोबाईट (१ KB) = १ मेगा बाईट (१ MB)


१ मेगा बाईट (१ MB) = १ गिगा बाईट (२ MB)

१ गिगा बाईट (२ MB)  = १ टेरा बाईटस (१०२४ GB)


      डिजीटल भाषाच संगणकाला कळत असल्यामुळे वर्डपॅडमधील अक्षरे केल्कुलेटर (Calculator) मधील ० तें ९ अंक तसेच सर्व प्रकारच्या विंडोतील आज्ञा व सूचना (प्रोग्राम्स) कॉम्पुटरमध्ये त्याला समजणाऱ्या डिजीटल भाषेमध्ये पाठवल्या जातात. संगणक शास्त्रज्ञानी निरनिराळे रंग व आवाज ह्या करताही डिजीटल भाषेतील संख्या निश्चित केल्या आहेत. त्यांचे डिजीटल भाषेत रुपांतर करणारी इलेक्ट्रोनिक्स साधनेही बनवली आहेत आणि कॉम्पुटरकरता खास प्रोग्राम्सही तयार केले गेले आहेत. त्यामुळे आपल्याला कॉम्पुटरवर म्हणजेच संगणकावर सिनेमे पाहणे, संगीत ऐकणे ह्या आणि अश्या अनेक कृती / गोष्टी शक्य झाल्या आहेत.


     संगणकाच्या मेमरीची साईझ म्हणजेच माहिती साठवण्याची क्षमता अश्या पद्धतीत आपल्याला हव्या त्याप्रमाणत वाढवता येते, हे एव्हाना आपल्या कळाले आहे. आता डेटा(माहिती) साठवण्यासाठीचे वेगवेगळ्या मेमरींजचा अभ्यास आपण पुढच्या सदरात करूयात.

            मागील लेख                                                                                  पुढे पहा

Saturday 22 August 2015

माझे मनोगत - ढोल बाजे

          ढोल माझी आवड.  ढोल माझे प्रेम.  ढोल माझा आनंद.  ढोल माझा श्वास.  ढोल पाहिले तरी अंगात वीरता येते.  अंग शहारून जाते.  ढोलाचा नादच भारी.  आपणही कंबरेला ढोल बांधावा.  बेभान होऊन वाजवावे.  ढोलाचा टीपरूच हातात घेतल्यावर मनगटात जे बळ येते त्याची तुलना कोणत्या ताकदीशी होऊ शकत नाही, असे मला वाटते.  माझे गाव पुणे.  मला पुण्याला ढोल वाजवायला जायला मिळाव म्हणून कधी शिक्षणाचे निमित्त तर कधी नोकरीचे निमित्त करून तिथे जाता यावा ह्यासाठी माझी धडपड चाले.  

        मुंबईत नोकरी करत असताना मला interview चा कॉल आला.  त्यांचे टेलीफोनिक आणि पर्सनल असे एक एक राउंड करत ५ व्या राउंडला फाईनल सिलेक्शन झाले. तुला ट्रेनिंग साठी १५ दिवस पुण्याला जावे लागेल.  हे ऐकूनच खुश झाले होते.  जॉब पेक्षा खरा आनंद यंदा पुण्याला जाऊन ढोल वाजवायला मिळेल हाच होता.  गणेशोस्तव जवळ आलेला.  मागच्या दोन वर्षापासून मी माझ्या पुण्याच्या ग्रुप मध्ये ढोल साठी येणार म्हणून त्यांना सांगून झाले होते पण त्या वर्षी जायला भेटल नाही म्हणून आता तरी स्वप्न पूर्ण होईल ह्या आशेत मी खूप खुश होते.

        ट्रेनिंग साठी पुण्याला १५ दिवस जावे लागेल असे त्यांनी सांगितले.  तसेच राहण्याची सोय न झाल्यास मला तसे ट्रेनिंग शेडूल करून देऊ असेही सांगितले गेले. सगळे फाईनल झाले आणि माझी आहे त्या जॉब मधून रीजाईन करण्यासाठी आणि तसेच पुण्याला जाऊन राहण्यासाठीची सर्व तयारी सुरु झाली.  सर्व तयारी झाल्यावर मला त्या कंपनीतून फोन आला कि, ऑफर लेटर आपको आप इमेजिएट जोइन करणे के समय मिलेगा| सगळ काही झाल्यावर अचानक असा फोन गडबडून गेले. कारण हे शक्यच न्हवत. सद्गुरूंचा फोटो समोरच होता. रडले मी बापू जवळ म्हंटल मागच्या वर्षी पासून पुण्याला जायचे म्हणतेय ढोलसाठी, पण ह्याही वर्षी जाणे होत नाहीये बापू. जोब्चे मला काहीच वाटत न्हवते पण सगळ काही ढोल वाजवायला मिळण्यासाठी चाललेली खटाटोप होती.

        मला अजूनही तो क्षण खूप छान आठवतोय. सद्गुरु जवळ रडत असताना अचानक त्याच क्षणी माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि मला बोलली, मला १ ते ६ हात ढोलचे हवे आहेत ते सांग ना! मी मनात बोलली, हि अशी का विचारतेय? एवढं कधी विचारलं नाही.  आजच आणि तेही माझा नेमकं ढोलचे पुण्याला जाण्याचे कॅन्सल व्हावे तेव्हाच?  तिला म्हंटल देते आणि फोन ठेवून सद्गुरुंकडे पाहिलं तर त्यांचा चेहरा मला एवढा हसताना दिसला कि मी विचारात पडले. आणि पटकन ट्यूब पेटली बापूंकडे ढोल वाजवतात. तिला फोन केला आणि विचारल, मध्येच का विचारलस तू आणि कशासाठी? बोलली अगं हव होतं. ती पुढे बोलायचा आत मी तिला प्रश्न केला बापूंकडे ढोल चालू झालं का? तर बोलली हो. मी बोलली माझ्यासाठी विचार तर सांगितल फुल झाले आहेत; आता कोणाला घेत नाहीत. पुन्हा निराशा झाली माझी. कारण मला 'ढोल' चीच पडली होती. ढोल माझं passion.  म्हंटल, ठीक आता काय करू असा बघून बापूकडे पाहिले पुन्हा बापू हसला. 
    
         ढोलमध्ये नवीन कोणाला घेत न्हवते.  मला सांगितले गेले तू लेझीम मध्ये जा. मनात बोलली ठीक आहे, आपण लेझीम एन्जोय करून पाहू, नाराज नको व्हायला. आणि मी लेझीम खेळत असताना ते लेझीमच्या काउंटच्या ऐवजी मी हातातली लेझीम ढोलच्या टीपरु पकडल्यागत वाजवत सगळ लक्ष ढोलकडे. लेझीमची को-ओर्डीनेटर बोलली जायचं का तिथे?  मनात म्हंटल हा, मी त्याचसाठी आहे.  क्षणातच मला निरोप आला तुला बोलावलंय.  आणि माझी ढोल मध्ये एन्ट्री पक्की झाली.

         त्यातही मला ढोलमध्ये माझ्या सद्गुरुं समोर ढोल वाजवण्याची संधी आली.  बापू जस-जसा जवळ येत होता धडधड वाढत होती.  आगमनाच्या वेळेस ज्यावेळी आम्ही गुरुक्षेत्रमला सद्गुरुं समोर वादन करणार होतो, तेव्हा पुढे मला थांबायला सांगितलेले.  तेव्हा अक्षरश त्याच्या समोर गेल्यावर खरच काही सुचत नाही हे खरं आहे. मी फक्त त्यालाच बघत होती. आणि त्यावेळी त्याने मला दोनही डोळे मिचकावून जी नजर दिली ती अफलातून होती.  श्रीराम. आणि एवढा गोड हसला, जसा कि माझा बापू मला बोलला; झाली का तुझी इच्छा पूर्ण. श्रीराम! श्रीराम!!! श्रीराम!!!!! खूपच सॉलिड क्षणं होता तो माझ्या आयुष्यातला.  सद्गुरुकृपेने मी अंबज्ञ आहे.  विश्वासात भक्तीत मी कमी पडतेय पण तरीही माझा भार माझा अनिरुद्ध, माझा बाप उचलतोय. माझी फुल सेटिंग बापूने लावली अगदी १०८ टक्के.  होळीच्या दिवशी साईनिवासला मी पोचतही न्हवते आणि मला बापूंच दर्शन मिळनहि शक्य न्हवत पण लास्ट रो मधून मला फर्स्ट रो मध्ये आणणारा माझा बाप, मला माझ्या आय लव यु ला, लव यु बाळा बोलला ह्या त्याच्या उत्तराने खरच अगदी १०८ टक्के माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्या बापूचरणी अर्पण आहे. आणि हे सर्व तोच करून घेतो आणि तोच करतो. मला कुठून कसं आणलं, त्याला माझ्यासाठी किती कष्ट पडले हे तोच जाणतो.  

जे जे मजसाठी उचित | तेचि तू देशील खचित |
हे मात्र मी नक्की जाणीत | नाही तकरार राघवा ||

                                                                                                                                                                    - अनुप्रिया आदित्य सावंत.

Friday 21 August 2015

वादक - अनिरुद्ध गुरुक्षेत्रम पथक

(Photo Source : https://www.facebook.com/shrianiruddhagurukshetrampathak/photos/)


बापूंनी आमच्यातला 'वादक' अचूक हेरला,
आमच्यातली 'कला' ओळखून जल्लोष घडवला.

जल्लोष जल्लोष जल्लोष,
ह्याची खरी धुंधी,
बापूंच्या प्रेमाने नसानसांत भिनली.

निमित्त एकच,
'अनिरुद्ध गुरुक्षेत्रम पथक'.
आमच्यातला कलाकाराला
'कलादालन' खुले झाले.
आयुष्याला नवीन दिशा,
दिशेला नवीन मार्ग मिळाला.

कला माणसाला जीवन जगायला शिकवते,
बापूंनी प्रत्यक्षात जीवन सजवायला शिकवले.

बापू आमच्या आयुष्यात,
सद्गुरु म्हणून लाभला.
तेथूनच आयुष्याच्या वळणाला,
सुंदर कलाटणी लाभली.

असा हा आमचा बापू,
नुसता आमचा बापच नाही.
तर आमचा खराखुरा,
'आप्त' म्हणून भेटला.

आमच्यातला सुप्त गुणांना,
भारीच वाव मिळाला.
कारण संगतीला अनिरुद्धाची,
नावच आयुष्यात उतरली.

असा हा आमचा बाप लईच भारी हायं!!!!!
म्हणूनच अनिरुद्धाची पोरं हुशार हायं!!!!!!

                                        - अनुप्रिया आदित्य सावंत.
                                        ('अनिरुद्ध गुरुक्षेत्रम पथक'.)

कविता #5 - शब्द आणि कविता



कोणी म्हणतं शब्दाला थोडी पोलीशिंग हवी. 
कोणी म्हणतं शब्दाची जुळवाजुळव हवी.
कविता हि कशी आतून जुळायला हवी,
पण आतून काय नि बाहेरून काय कळत नाही बुवा,
तरीही मी एक, कविता करून पाहणार.

शब्दांच्या जूळवनेत बनते मोठे कोडं,
कोडांच्या कचाट्यात बसते शब्दांची दातखीळ,
शब्द जुळले नाही शब्दाला, तरी घेऊ थोडे कष्ट.
प्रेमाला कसे प्रेम जुळले कि झाले आमचे मस्त.
तरीही मी एक, कविता करून पाहणार.

काना मात्रा उकार ह्याला नाही येत आकार.
वजाबाकी बेरीज करता गणिताचा होतो भोपळा.
गणिताचा पाढा नको, भोपळ्याची भाजी नको.
तरीही मी एक, कविता करून पाहणार.

कवितेत येतो चंद्र, तारे, चांदणे,
मधेयचं भरतात कुठून तरी पाने, फुले, फळे.
शब्द येते, मन येते, येते मध्येच प्रेम पोवाडे.
चंद्राच्या ह्या प्रकाशात चमकते कसे चमचम, 
गफलत होते पक्की, नक्की काजवा कि चांदणं.
आहे काय नाही काय कळे काही प्रकार काय,
तरीही मी एक कविता करून पाहणार.
                      
                    - अनुप्रिया सावंत.

Tuesday 18 August 2015

संगणकीय मेमरी - प्रायमरी स्टोअरेज मेमरी



      आपण जसे हात, पाय, नाक, कान, डोळे, त्वचा ह्या आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांमार्फत आपले कार्य करत असतो, त्याचप्रमाणे संगणक माऊस,कीबोर्ड, कॅमेरा, प्रिंटर, स्पीकर अश्या संगणकाच्या साधनांद्वारे माहितीची देवाण घेवाण करण्याचे कार्य करतो. आपण जसे मेंदू मध्ये गोष्टी साठवतो / लक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे संगणकही त्याच्या गोष्टी लक्षात ठेवत असतो. संगणकालाही काम करण्यासाठी मेंदूची आवश्यकता असते. परंतु संगणकाचा मेंदूचा भाग हा मेमरीच्या स्वरुपात असतो. आपण शाळेत शिकलेल्या सर्व गोष्टींची नोंदी आपल्या वहीमध्ये करतो. आणि आपल्याला हवे तेव्हा त्याचे वाचन ही पुन्हा पुन्हा करतो. त्याच प्रमाणे संगणकाची मेमरी संगणकमध्ये माहिती साठवण्याचे कार्य करते. ह्या माहितीद्वारे संगणक त्याची कार्ये चोखपणे पार पाडत असतो.



आपण एक उदाहरण पाहूयात,
     आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात स्मरणशक्तीचे महत्व अनन्यसाधारण आहे. समजा तुम्हाला एक महत्वाचा फोन करायचा आहे. पण त्यावेळेला तुम्हाला तो नंबरच नीट आठवत नसेल. तर तुम्ही काय कराल? तो नंबर ज्या वहीत लिहून ठेवला आहे त्या वहीचा वापर कराल. असेच काहीसे आपल्या संगणकाच्या बाबतीत असते. संगणकाला कार्यरत राहण्यासाठी काही माहितीची सतत आवश्यकता असते, तर काही माहिती संगणकाला तात्पुरत्या स्वरुपात पुरवली जाते.

त्यामुळे संगणकाची मेमरी ही विशिष्ट कार्यपद्धतीसाठी दोन भागात विभागली गेली आहे.
१. प्रायमरी स्टोअरेज मेमरी २. सेकंडरी स्टोअरेज मेमरी
आता आपण जाणून घेऊयात प्रायमरी स्टोअरेज मेमरी.
प्रायमरी स्टोअरेज मेमरी - प्रायमरी स्टोअरेज मेमरीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार येतात.
     १)रॉम(ROM ) 
     २)रैम(RAM )



१) रॉम (ROM ) - 
संगणकातील रॉम ही चिप्सच्या स्वरुपात मदरबोर्ड वर कायमस्वरूपी बसविलेली असते. ह्यात प्रोग्राम्स व डेटा साठवलेला असतो. 
   

     या मेमरीमध्ये एकदा लिहिलेली माहिती फक्त वाचता येते, ती पुसता येत नाही. तसेच तिच्यात बदलही करता येत नाही. प्रत्येक संगणकाच्या मदरबोर्डवर BIOS नावाची ROM चीप असते. जिच्यामध्ये संगणक सुरु केल्यावर, तो कार्य करण्यासाठी, सिद्ध होण्यासाठी BIOS मधील प्रोग्राम्स व कमांड्स 'रन'(सुरु) होतात. व संगणकातील आवश्यक बाबींची पूर्तता होते कि नाही याची छाननी होते.

     BIOS मधील प्रोग्राम आपण बदलू शकत नाही. कारण ते प्रोग्राम्स संगणक निर्मात्याने कायमस्वरूपी बनवलेले असते.  हो, जर आपल्याला स्वतःला प्रोग्राम तयार करून ही ROM ची चीप बनवायची असेल तर बाजारात तश्या ROM चिप्स उपलब्ध आहेत.

त्यांच्या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात - 

१) PROM (प्रोग्रामेबल रॉम) - यावर एकदाच प्रोग्राम लिहिला जाऊ शकतो. एकदा सेट केलेला प्रोग्राम आपण पुन्हा बदलू शकत नाही.


२) EPROM (इरेजेबल प्रोग्रामेबल रॉम) - बनवलेला प्रोग्राम आपल्याला इरेज म्हणजे पुसता येतात. व त्यात पुन्हा नवीन प्रोग्राम भरता(स्टोर) करता येतात. ह्यावरील माहिती फक्त वाचता येते. एडिटिंगचा प्रकार ह्यात करताना आहे तो डेटा पूर्ण नष्ट करून मगच नवीन प्रोग्राम भरता येते.
ह्याचेही दोन प्रकार आहेत.

1) EEPROM (इलेक्ट्रीकली इरेजेबल PROM ) 
2) UVEPROM (अल्ट्रा व्हायोलेट PROM ).

* EEPROM मध्ये असलेल्या डेटा(माहिती) जादा विद्युतदाब दिला गेल्यास नष्ट होतो. ह्यांना फ़्लेश मेमरी असेही म्हणतात. ह्यांचा वापर करणे सोयीची आणि सोपे असते. ह्यांचा वापर सेल फोन्स, MP3 प्लेयर्स, डीजीटल कॅमेरे ह्या मध्ये केला जातो.

* UVEPROM मधील डेटा अतिनील प्रकाश टाकला असता नष्ट होतो.


२) रैम(RAM ) -
     रैम ही संगणकाच्या इनपुटद्वारा आलेली सर्व माहिती व सूचना साठवते. रैमची माहिती साठवण्याची क्रिया ही अति जलद असते. त्यामुळे माहितीचा वापरही जलदगतीने होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर एखादे कच्चे काम करण्यासाठी लागणाऱ्या कागदसारखी असते. म्हणजेच एकदा का संगणक बंद झाला कि रैम मधील सर्व माहिती नाहीशी होते. म्हणून ह्या मेमरीला टेम्पररी(तात्पुरती) किंवा व्होलाटाईल मेमरी असे म्हणतात. रैमची क्षमता ही मेगाबाईट मध्ये मोजली जाते. संगणकाचा वेग हा रैमच्या क्षमतेवर अवलंबून असतो. रैम कार्ड मदरबोर्डवरील स्लॉटमध्ये बसवतात. 

     रैमची क्षमता वाढवायची असल्यास मदरबोर्डवरील अतिरिक्त स्लॉटमध्ये रैम कार्ड वापरून रैमची क्षमता आपण वाढवू शकतो.
रैमचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत - 
१) डायनेमिक रैम(DRAM )
२) स्टेटीक रैम(SRAM )

) डायनेमिक रैम (DRAM ) - यामध्ये मेमरी सेल तयार करण्यासाठी कॅपासिटर व ट्रानझिसटर वापरला जातो. कॅपासिटर हा विद्युतभार साठवून ठेवणारा डिव्हाइस आहे. जेव्हा हा विद्युतभारीत (चार्ज) असतो, त्यावेळी सेलमध्ये साठवलेली बायनरी किंमत १ असते. परंतु हा कॅपासिटर सतत गळत असतो त्यामुळे त्याला सतत चार्ज करावे लागते. ह्या चार्ज करण्याच्या प्रक्रियेला रेफ्रेशिंग असे म्हणतात. सततच्या ह्या रेफ्रेश क्रियेमुळे त्याला अस्थिर किंवा डायनेमिक रैम असे म्हणतात.
DRAM चा उपयोग संगणक तसेच प्लेस्टेशनसारख्या गेमिंग मध्ये करतात.


२) स्टेटीक रैम (SRAM ) - स्टेटीक रैम ही जलद गतीने काम करते. तसेच तिला विद्युतपुरवठाही कमी प्रमाणात लागतो. एसरैम मध्ये साठवलेली माहिती विद्युतपुरवठा सुरु असेपर्यंत स्थिर राहते म्हणून तिला स्टेटीक रैम असे म्हणतात. 

SRAM डीजीटल कॅमेरा मोबाईल फोन्स ह्यासाठी वापरली जाते.
     आज आपण संगणकाच्या ह्या प्रायमरी स्टोअरेज मेमरीबद्दल बेसिक माहिती जाणून घेतली आहे.
     आपण बऱ्याचवेळा असे म्हणतो, संगणकावर लोड येतोय त्यामुळे संगणकाची मेमरी वाढवायला हवी.  तर हे संगणकाची मेमरी वाढवणं म्हणजे नेमकं काय?  ह्या विषयी जाणून घेऊयात पुढच्या सदरात.

                  मागील लेख                                                                                पुढे पहा