बऱ्याच दिवसांनी
मोकळा वेळ मिळाला मात्र शब्दाला गती मिळत नाहीये.. अक्षरही शब्दांमध्ये
गुंफले जात नाहीयेत.. मन शांत आहे तरीही अनेक विचारातून फिरत आहे..
संध्याकाळची मैफिल ताऱ्यांनी सजल्यासारखी नटली आहे.. चांदण्या रात्रीत शाल
पांघरल्यासारखे शब्द पहुडले आहेत.. मनाला उसंत मिळाली भावनेला नाही..
शब्दाला जागवायला हवं.. मनाची झेप अनेक विचारांत गवसणी घालतंच आहे.. त्यातूनच गवसलेली ही सैरभैर मनाची सर...