Thursday 6 December 2018

शिदोरी - दोन सुयांची


     थंडीच्या वातावरणातील संध्याकाळचा गारवा मनाला एकदम प्रफुल्लीत करतंय ना! सोबत वाफाळता चहा आणि चवीला कांदा भजी हे समीकरण तर मला ऑल टाईम भन्नाट वाटतं. काय वाटतं? कधी थकली, दमली, उल्हासित असली किंवा अगदी चिडलेली जरी असली तरी चहाशी मी कधीच रुसत नाही. निवांतपणे तर ह्याची माझी जास्तच गट्टी जमते. चहा व त्याची वाफाळती वाफ जणू अस्पष्ट धुकचं भासतात, जे मला माझ्या मनाच्या गावी अलगद घेऊन जातात.

     माझी आई, मी व चहा ह्या तीन गोष्टी एकत्र आल्या की गप्पांना अगदी उधाण येतं. खासकरून थंडीच्या ह्या दिवसात मला आईच्या खास दोन सखी आवर्जून आठवतात.
हो, माझ्या आईच्या दोन खास आवडत्या सख्या आहेत. त्या आईच्या आवडत्या आहेत, की आई त्यांच्या आवडती, हे माझ्यासाठी एक गमतीशीर विधान आहे. ह्या दोन सख्या म्हणजे दोन सुया/निडल्स. आश्चर्य वाटलं ना! हो खरच. 

     ह्या निडल्सने ती जेव्हा तिच्या बाळांसाठी स्वेटर विणते तेव्हा तिला जो आनंद होत असतो, तो पाहणं हा माझा छंद आहे. हा छंद जोपासणं माझा ध्यास आहे.  ह्या दोन निडल्सची गोष्ट ऐकताना मन पूर्ण हरखुन जातं.  अफाट प्रेम, वात्सल्य, करूणा ह्यांचे मूर्तिमंत रुप असणारी ही माझी आई तिच्या लेकीची ओटी भरताना तिची शिदोरी जोडत असते, ते तिच्या प्रत्यक्ष कृतीनेच.

     आपण आपल्या बाळासाठी त्याला थंडी वाजू नये म्हणून कानटोपी, हातमोजे, स्वेटर हे घालून छान कव्हर करतो ना! मात्र अशी बाळं ज्यांना थंडी वाजते पण अंगावर घ्यायला चादरही नसते, घालायला स्वेटर नसतो, ना कान झाकायला रुमाल.  मग अशा बाळाची काळजी कोण करत असतं?  ही माझी आई मात्र हे करत असते आणि करवूनही सहज घेते.  ना कधी दमत, ना थकत, ना थांबत, ही फक्त कष्ट करत असते. तेही Unstoppable. Yes!

     आईच्या पदरात लपण्याची, खेळण्याची मज्जा वेगळीच असते ना! ह्याच पदराने जेव्हा ती लेकीची ओटी भरते तेव्हा मुलगी तीची शिकवण शिदोरी रुपी जपत असते.  हो ना!

   आपण प्रत्येक जण काही ना काही कामात अडकलेलो असतो.  रस्त्याने जाताना येताना आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात, जाणवत असतात.  मात्र काही गोष्टीबद्दल आपण अनभिज्ञ असतो, तर काही गोष्टी आपल्याला माहीत असून पण त्यासाठी काही करता येत नसतं. 

     रस्त्यावर आपल्याला अनेक लहान बाळ किंवा वृद्ध वयस्क स्त्री पुरुष दिसतात.   ज्यांना अंगावर नीट कपडेही नसतात. मग थंडीपासून संरक्षण करताना त्यांची तारेवरची कसरत होते. मुंबईची थंडी आणि गावाकडची थंडी ह्यात तर जमीन अस्मानचा फरक. तुटपुंज्या पगारावर घर खर्च चालवताना अनेक कुटुंब अनेक गोष्टींचा सामना करत असतात.  

     मग आशा ह्या बाळांना, कुटुंबांना आपल्या इथून स्वेटर विकत घेऊन देऊयात का? आई हे सांगत असताना आईचं बोलणं मध्येच थांबवत माझा प्रश्न मी आईला विचारला.

    जगात कुठलीच गोष्ट फुकट मिळत नाही ही माझ्या आईची शिकवण आहे.  प्रत्येक गोष्ट कष्ट करून घ्यायची असते आणि मग त्याचे रसाळ फळही आपल्याला परमेश्वर तितकेच गोड देतो.  हा माझ्या आईचा ठाम विश्वास. आईच्या हातात नेहमीच विणण्याचे निडल्स असायचे, ज्याने ती स्वेटर बनवायची.  तिला आम्ही सर्वच नेहमी सांगायचो, अगं आई आपण विकत घेऊन देऊयात ना!  कशाला स्वतःचा वेळ घालवतेस, तेवढा आराम मिळेल तुला. उगाच ते निडल्स आणायला दुकानात जायचं पुन्हा तासनतास विणत राहायचं,  हात किती दुखतात त्याने. पण आई आम्हाला फक्त छान स्माईल द्यायची. त्या हसण्यात वेगळीच प्रसन्नता लाभयची. 

    जस जसे मोठे होत गेलो तशी आईची शिकवण फुलत गेली.   हळूच स्मित हास्य करत आई आम्हाला ह्या निडल्सची गोष्ट त्याचे महत्व शिदोरी रूपाने द्यायला लागली. घरची, ऑफिसची, बाहेरची कामे तसेच कुटुंबाची जबाबदारी सांभाळूनही तिचं निडल्स वरचं प्रेम कधीही कमी झालं नाही.  आणि तिच्या सवयीने ते प्रेम तिने आमच्याही ओटीत द्यायला सुरुवात केली.  आणि आम्ही कधी त्यात रमलो ते कळलंच नाही.

     आईच्या दोन सख्या म्हणजे ह्या दोन निडल्स 'भक्ती' व 'सेवा' ह्याचे प्रतिक आहेत.   कालांतराने हळु हळू हयाचेे स्ववरुपही कळत गेले.  आई हेे स्वेटर 'कोल्हापूर मेडिकल कॅम्प' मधील तिच्या बाळांना देण्यासाठी करत असते.  तिची बाळं हे स्वेटर घेताना व ते घालताना त्यांना जितका आनंद होतो, त्याच्यापेक्षा अधिक आनंद ह्या माऊलीला होताना पाहताना भान हरपून जाते.  आपल्या आईला असं आनंदात पाहणं हे प्रत्येक बाळाला हवंहवंसच असतं ना!  तो आनंद, तो उत्साह जेव्हा आपल्या आईकडूनच आपल्याकडे येतो तेव्हा खरच मनाला 'भक्तिभाव चैतन्य' लाभल्या सारखं वाटतं. खरंच!

     आई नेहमी सांगते, आपण जेव्हा ह्या दोन निडल्स घेऊन स्वेटर विणतो तेव्हा आपण 'भक्ती' आणि 'सेवा' ह्या परमेश्वराच्या आवडत्या गुणांना जोपासत असतो. आणि ह्यातून आपला सर्वांगीण विकास होत असतो. 


हल्ली धावपळीच्या जीवनात मनाला शांतता फार कमी मिळते. जरा मोकळा वेळ भेटला की असं वाटतं सगळं सोडून आईच्या पदराखाली लहान होऊन मनसोक्त बागडावं, तिची शिदोरी अनुभवावी. हा चहा, कसा मस्त आईच्या शिदोरीची सफर घडवून आणतो ना! माझ्या विचारांची तंद्री भंग करता नेमका फोन खाणाणला. इंकमिंग कॉल... आईsss!....
काय म्हणताहेत माझ्या दोन्ही सख्या? हाहा...

     जणू तिला बसल्या जागीच कळालं माझ्या मनातले विचार. आईच ना ती. आपल्या लेकीच्या मनातले कळणार नाही, असं कसं होईल?

     सेवा आणि भक्ती हे संसारातून परमार्थ करताना कसे साधायचे? ह्याचा मार्ग मला माझ्या आईने ह्या दोन निडलच्या साहाय्याने ओटी स्वरूपात दिल्या.   तिची ही शिदोरी तिच्या प्रत्येक बाळांसाठी आहे.   निःस्वार्थ प्रेम, निःस्वार्थ भक्ती आणि निःस्वार्थ सेवा परमेश्वराला अतिशय प्रिय आहेत.  आणि ही गोष्ट माझी आई तिच्या लेकींकडून अगदी सहज करून घेते.  तिची अपेक्षा , ईच्छा एकच आपल्या लेकीचं चांगलं व्हावं.   लेकींच्या संसाराची वेल फुलवताना भक्ती व सेवा घडवून तिचा प्रपंच सुखात करण्यासाठी माझी आई तत्पर असते.  ही तिच्या दोन सख्यांच्या साहाय्याने येणाऱ्या संकटातील काटे अगदी सहजच बाजूला काढते.  माझी आई आहेच सॉलिड, सेवेला भक्तीची जोड देऊन आयुष्यात भक्तिभाव चैतन्य निर्माण करणारी.  अशी सेवा, ज्याने.....
        जन्म माझा व्यर्थ ना हो मृत्यु लागो सार्थकी ।

     सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली ‘अहिल्या संघा’ तर्फे ‘वात्सल्याची ऊब’ हा उपक्रम राबविण्यात येतो.  ज्या स्त्री श्रद्धावानांना स्वेटर्सचे विणकाम करण्याची इच्छा आहे, अशा स्त्रियांना अहिल्या संघातर्फे विनामूल्य विणकामाचे प्रशिक्षण दिले जाते.

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळ/ वेबसाईटला भेट द्या:
https://aniruddhafoundation.com/compassion-vatsalyachi-oob/

                           - अनुप्रिया सावंत.

Tuesday 4 December 2018

थर्ड वर्ल्ड वॉर - 4 - गिलेट्स ज्यून्स " / Yellow Vest


     सरकारने आखलेल्या धोरणांचा आपल्याला राग आला किंवा निषेध करायचा झाला तर आपण आंदोलने उभारतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा शब्द जवळजवळ माहीतच आहे. निषेध शांततेत होतो किंवा एखादया मैदानात सभा भरवून भाषणे केली जातात. मात्र ह्याचे स्वरूप तीव्र झाल्यास सर्वच नागरिकांना परिणामी त्या राष्ट्रालाही धोकादायक ठरते.

     भारतात 1993 ला झालेली दंगल व त्याचे स्वरूप बऱ्याच जणांनी पाहिले, अनुभवले. सरकारच्या धोरणेतील बदल जनसामान्यांनाही बदलवत असतोच.

     आपण भारतात राहत असलो तरी दुसऱ्या देशातील बदल आपल्या देशातही जाणवतो.  ह्याचे सोपे उदाहरण सांगायचे  झाले तर, देशातील आयात निर्यात वस्तूंबाबतचे करवाढ. कर वाढले की ते एकाच गोष्टीवर वाढले जातात असं कधीच होऊ शकत नाही.  प्रत्येक गोष्टींवर त्याचा परिणाम होताना आपण अनुभवतो.  दुधाचा भाव वाढला की टपरी वरील चहाचा भाव सुद्धा वधारतो.  मग तर  हॉटेलची गोष्टच वेगळी.

    बऱ्याचदा मिडल क्लास कुटुंबाचे गणित सुद्धा ह्या बदलाने बदलत जातात.  तर मग त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गटांचे प्रश्नच दबले जातात. आमच्याकडे दूध विक्रेत्याने प्रत्येक लिटरमागे 2 रुपये वाढवले.  कारण ऐकून हसावं की रडावं हेच कळाले नाही.  म्हणतो कसा, क्या करे, पेट्रोल बढ गया इसलीये दूध का भाव भी बढ गया| आता सायकल वरून दूध विकताना पेट्रोल कसं खर्च होत, हे गणित काही केल्या सुटायला वेळच लागला.  सामान्य प्रश्न वाटला तरी प्रत्यक्षात त्याचा आवक खूपच मोठा आहे.

    सामान्य जनता अगदी दररोजच्या कमी अधिक बदलला सहज सामावून घेत असते.  मात्र जेव्हा हे बदल तीव्र स्वरूप घेतात तेव्हा मात्र अल्प उत्पन्न गटापासून उच्च उत्पन्न असणाऱ्या सर्वांनाच ह्याचा त्रास हा होतोच आणि त्याची परिणामीकता निषेधात होते.  हा निषेध शांत करणं हे सरकारचेच काम आहे, असं आपण सहज बोलतो ना!  पण तुम्हाला काय वाटतं... आपली जबाबदारी झटकून आपण थांबतो का?

    जागतिक घडामोडी पाहिल्या की आपण खरंच भारतात किती सुरक्षित आहोत ह्याची पदोपदी जाणीव होते.  आज फ्रान्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनाविषयी खूपच कमी जणांना माहित असावं. किंवा तो आपला भाग नाही, आपल्याला काय त्याचं... असही सहज म्हणतो ना आपण.

     जागतिक युद्ध हे प्रत्येक देशाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभावित करित असते.  हे युद्ध फक्त त्या देशांपुरतेच मर्यादित नाही राहू शकत.  कारण त्याचा विस्तार इतक्या प्रचंड वेगाने होत असतो की त्याची झळ बसल्यावर आपल्याला जाणीव व्हायला चालू होते.   फ्रांसमध्ये चालू असलेली चळवळ ही अशीच सामान्य नागरिकांपासून ते अगदी उच्चशिक्षित ते उच्चवर्ग ह्या सगळ्याच लोकांना घेऊन उभी आहे.  ह्याचे कारण(?)... वाढते इंधन कर.  ह्या चळवळीने इतके आक्रमक स्वरूप घेतले आहे की त्याला हिंसेचे रूप प्राप्त झाले आहे. 

     'गिलेट्स ज्यून्स' (पिवळे वेस्ट्स ) असे ह्या चळवळीचे नाव ठेवले गेले आहे. चळवळीत सहभागी लोकांनी पिवळे जॅकेट्स वापरून सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहेत.

     विरोधक हे फ्रान्समधील शहरे आणि ग्रामीण भागांमधून आले आहेत आणि त्यात अनेक महिला व एकल माता आहेत. बहुतेक निदर्शकांना नोकऱ्या आहेत, त्यात सचिव, आयटी कर्मचारी, कारखाने कामगार, वितरण कर्मचारी आणि देखभाल कर्मचारी यांचाही समावेश आहे.  विरोधकांचे म्हणणे आहे की , त्यांचे कमी उत्पन्न असल्यामुळे त्यांना बेसिक गरजा भागावणेही कठीण आहे.  काही जण म्हणतात आम्हाला खूप सावधपणे आमचं आयुष्य जगावं लागतं, जीवनातल्या सुखसोयी कमी होत चालल्या आहेत, परिणामी हॉटेल मध्ये जाण सुद्धा परवडत नाही.   काही आंदोलककारक म्हणतात की, आमचा पैसा इतका अपुरा आहे की आम्हाला आमच्या पालकांना घेऊन नर्सिंग होम किंवा धर्मदायमध्ये जावं लागतं. परिणामी ह्या सगळ्याच भावनांचा उद्रेक म्हणजे ही चळवळ.

     मॅक्रोनच्या (फ्रांस) सरकारने अनेक हवामान बदल-संबंधित इंधन कर लागू केले आहेत.  जानेवारीत आणखी एक पाऊल टाकणे समाविष्ट आहे.  मॅक्रॉन म्हणतात की, हे कर म्हणजे ड्रायव्हर्सला पर्यावरण-अनुकूल मॉडेलसाठी डिझेल-इंधन चालविणारे वाहन बदलविण्यास प्रोत्साहित करणे.  परंतु, अनेक मध्यमवर्गीय फ्रेंच नागरिकांना ही लूट वाटते.   ह्यासाठी जवळजवळ 75 हजारापेक्षा अधिक निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत.   विशेष म्हणजे ह्या चळवळीचा एकही सिंगल लीडर नाही(?) असे सांगितले जात आहे.  नोव्हेंबर आठवड्याच्या अखेरीस फ्रान्सच्या राजधानीच्या रस्त्यावर हजारो लोकांनी दंगली केल्या, त्यापैकी अनेकांनी कार चालवताना पिवळ्या पिशव्या लावल्या.

     2015 च्या पॅरिस वातावरणाच्या करारा अंतर्गत निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी इंधनवाढ हा फ्रान्सच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.  निवडून आल्यावर मार्कोनने पर्यावरणला प्राथमिकता देण्याचे वचन दिले होते, परंतु त्याच्या कर धोरणामुळे मध्यमवर्गीयातील बऱ्याच लोकांना वेगळे केले गेले. आणि त्याचे एकंदरीत परिणाम म्हणजे ही हिसंक झालेली चळवळ.

     फ्रान्स हा एक प्रजासत्ताक लोकप्रिय देश आहे, मात्र आज त्याची लोकप्रियता हिंसाचारात परावर्तित झाली आहे.  अतिशय घृणास्पद विध्वंस इथे चालू आहे.   जाणकारांचे म्हणणे आहे की ह्या लढाईत हिंसकता, निषेध, दंगली, विद्रोह हे अगदी गृहयुद्धापेक्षाही पुढे गेले आहे. आणि ह्यात काही कट्टरपंथीय आपले उद्दिष्ट साध्य करून घेत आहेत.
ह्या संदर्भात सविस्तरपणे वाचण्यासाठी खालील लिंक पहा:
वेबसाईट   - http://worldwarthird.com

ट्विटर      - @ww3Info , @NewscastGlobal

फेसबुक - Third World War, Newscast Pratyaksha

     आज आपण अभिमानास्पद अशा विशाल भारतात राहतो. आपला भारत देश महासत्ताकतेकडे यशस्वी वाटचाल करत आहे. इतर देशांशी आपले अनेक करार होत आहेत, वाढत आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण त्या देशांशी जोडले जात आहोत.  ह्यावरून आपल्या लक्षात ह्या गोष्टी यायला हव्यात की चालू घडामोडींबद्दल आपण सुज्ञ नागरिक म्हणून कशाप्रकारे जागृत राहायला हवं.

     वरवर जरी हे आंदोलन किंवा चळवळ आक्रमकता व नागरिकांचे रोष वाटत असले तरी प्रत्यक्षात ह्या गोष्टी तिसऱ्या महायुद्धाला आव्हान देणाऱ्या आहेत.  कदाचित 'न्यू वर्ल्ड ऑर्डर' षडयंत्राचा एक भागही असू शकतो.   कारण... Third World War has been started...

                                - अनुप्रिया सावंत.

थर्ड वर्ल्ड वॉर - 1 - सायबर हल्ला

थर्ड वर्ल्ड वॉर - 2 - ब्लॅक मॅजिक

थर्ड वर्ल्ड वॉर - 3- दहशतवाद व कट्टरपंथीय

थर्ड वर्ल्ड वॉर - 5 - व्हेनेझुएला - लोकशाही विरुद्ध हुकूमशाही

थर्ड वर्ल्ड वॉर - 6 - जागतिक महामारी (Pandemic - COVID-19)

Monday 3 December 2018

थर्ड वर्ल्ड वॉर - 3- दहशतवाद व कट्टरपंथीय


    


     'दहशतवाद व कट्टरपंथीयांपासून साऱ्या जगाला धोका' ही 'दैनिक प्रत्यक्ष' वृत्तपत्रातील बातमी वाचण्यात आली.  'दहशतवाद व कट्टरवादी यापासून साऱ्या जगाला मोठा धोका संभवतो.  म्हणूनच या धोक्याच्या विरोधात साऱ्या जगाने एकजुटीने कारवाई करायला हवी', असे आपल्या भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी आवाहन केले आहे.  दहशतवाद आणि कट्टरवाद या जगासमोरील सर्वात मोठ्या समस्या आहेत. 

     भीती व दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हिंसात्मक गुन्हेगारी दहशतवादींकडून घडवून आणली जाते. राजकीय हेतूने प्रेरित असलेले हे दहशतवादी संघटित, नियोजित व हिंसात्मक कृती घडवून आणतात.  लोकांच्या धर्मभावना भडकवून राजकारण व धर्माच्या हट्टाहासासाठी खेळी खेळल्या जातात.  ह्याचा ज्वलंत इतिहास म्हणजे पाकिस्तानचे धार्मिक युद्ध व काश्मिरी पंडितांचा बळी.  उठाव आणि दंगली ह्यातून कट्टरपंथीय त्यांची भूमिका(?) वरचढ ठरवतात. आज कट्टरपंथी हे समाजावर वरचढ झालेले आहेत. 

    ह्याविरोधी आवाज उठवणे महत्वाचे झाले आहे.  गेल्यावर्षी सुरक्षदलांनी हाती घेतलेले 'ऑपरेशन ऑल आऊट' जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद्यांच्या संपूर्ण उच्चाटनासाठी प्रचंड यशस्वी ठरले. ह्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांचे खच्चीकरण झाले.

     कट्टरपंथीयांची भूमिका ही अत्यंत द्वेषाची व वातावरण चिघळवण्याची आहे.  आताच्या  पॅलेस्टाईन लढ्यामागे इस्लामी हेतू असल्याची दाखवले जात आहे , मात्र त्यांचा मूळ हेतू मात्र अधिराज्य प्रस्थापित करणं आहे.  कट्टरपंथीय हे कोणत्याच देशाचे, राज्याचे किंवा मानवी हिताचे असूच शकत नाही. 

     कट्टरपंथीय जे तिसरे महायुद्धाच्या पटलावर कसे कार्यरत आहे, हे पहायचे झाले तर बरीच उदाहरणे आपल्या लक्षात येतील. 

   सौदीचे कट्टरपंथीय अमेरिका व इस्राईल विरोधक आहेत.  अस्साद राजवट आणि तेथील चाललेले खरे खोटे संघर्ष ह्याबद्दलही आपल्याला वृत्तपत्रातून हळू हळू माहिती होत चालले आहे.

  अमेरिकेतील इस्लामधर्मीय नेते 'वर्कशॉप फॉर पॅलेस्टाइन' बद्दल योजना आखताना वरवर जरी मानवतावादाचा दावा करत असले तरी त्यांची खरी योजना ही इस्राईल विरोधीच आहे.  जनतेला चिथावणी देणे, ज्यूंची कत्तल करून जेरुसलेमचा ताबा घेणे, जगभरातून जनतेला पॅलेस्टाईनच्या बाजूने वळवण्यासाठी मानवतावादाच्या नावाने सहाय्यता मिळवून त्याचे मार्केटिंग करणे.  कट्टरवादांचे असे अनेक मास्टरमाइंड प्लॅन जगभरात कार्यरत आहेत.

    युरोपात देखील हे कट्टरपंथीय फारच आक्रमक आहेत.  काही आठवड्यापूर्वीच अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये ज्यूधर्मीय द्वेषभाव बाळगणाऱ्यांनी केलेल्या विघातक कृत्यांच्या बातम्या समोर आल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धाच्या आधीही ज्यूधर्मीयांच्या विरोधात असाच द्वेषपूर्ण प्रचार सुरू करण्यात आला होता. आणि आताही ही संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे.

    भारतात झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ला, कट्टरपंथीयांनी घडवलेल्या 1993 च्या दंगली, बॉम्बस्फोट हे कोणीही विसरू शकत नाही.  आताच्या घडामोडीला चालू असलेला राममंदिराचा प्रश्न हा तर खूपच संवेदनशील आहे.  हा प्रश्न खरं तर प्रत्येक भारतीयांच्या मनाचा संवेदनशील भाग आहे. दहशतवादी संघटनेने राम मंदिर संदर्भात दिलेली धमकी ही चिथावणीची भाषा आहे.  ह्यामुळे पुन्हा एकदा भारत पाकिस्तान युद्ध पेट घेऊ शकतं हे आपण सर्वच जाणतो.

   चालू घडामोडी ह्या तिसऱ्या महायुद्धाच्या अनुषंगाने विशेष लक्ष वेधून घेतात.   दहशतवाद व कट्टरपंथीय या साऱ्यांच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने खडे ठाकले पाहिजे, असे आवाहन दूरदृष्टी असणारे भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी केलेले हे विधान विशेष लक्षवेधी आहे.

    ह्या गोष्टी फक्त अमेरिका, इराण, इस्राईल, युरोप, अरब ह्या देशातच चालू आहेत, ह्या भ्रमातून आपण भारतीयांनी बाहेर यायला हवं.  ह्याविषयी आक्रमक होऊन नाही तर सक्रिय भूमिका घेऊन तिसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेची जाणीव करून घ्यायला हवी. 

    आपल्याला युद्ध करायला जायचे नाही तर ते युद्ध होऊच नये किंवा त्याची झळ, त्याची तीव्रता कमी करता येण्यासाठी माझी भूमिका काय ह्याचा वेध घेता यायला हवा. त्यासाठी जगात चाललेल्या जागतिक पातळींवरील घडामोडींची माहिती ठेवणे गरजेचे आहे.   प्रत्येक देशात अनेक कुगोष्टी सर्व दिशांनी प्रचंड वेगात वेगवेगळ्या पद्धतीने पसरत आहेत. 

     ह्याविषयीची माहिती आपल्याला 
            http://worldwarthird.com 
 या वेबसाईटवर अधिक विस्तृतरित्या पाहता येते.  तसेेेच इंग्लिश, हिंदी व मराठी या तीनही भाषांमध्ये आपल्याला ह्या विषयीची अधिक माहिती उपलब्ध होते.

   हल्ली आपल्या स्मार्टफोन मध्ये फेसबुक आणि ट्विटर हे दोन्ही ऍप असतात व ते आपण वापरतही असतो. तिसऱ्या महायुद्धाच्या घडामोडी संदर्भातील बातमीसाठी कनेक्ट राहण्यासाठी आपण खालील ट्विटर व फेसबुक अकाऊंट आपल्याशी जोडू शकतो. जेणेकरून त्या पेजेस वरील अपडेटेड माहिती आपल्याला त्याचवेळेस नोटिफिकेशन्सद्वारे सहज उपलब्ध होते.
ट्विटर      - @ww3Info , @NewscastGlobal

फेसबुक - Third World War, Newscast Pratyaksha


    माझी भूमिका, माझी जबाबदारी, माझी आस्तिकता, माझी श्रद्धा, माझी धर्मनिरपेक्षता, माझा देश, माझे कर्तव्य, माझी निष्ठा ह्याबद्दल माझ्याच मनात नाही तर प्रत्येकाच्या मनात संवेदनशील जागृती करता यायलाच हवी. ह्याची जाणीव, खबरदारी हेच आपल्याला तिसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेला सामोरे जाण्यास सज्ज करतील.  कारण... Third World War has been started...