पत्रलेखन - पत्रलेखन कसे करावे?
पत्रलेखन म्हणजे आपणच मांडलेले आपले विचार, भावना, आपले मत किंवा कोणत्याही स्वरूपातील तक्रारी यांचे लेखी स्वरूपात केलेले लेखन म्हणजे 'पत्रलेखन' होय.
बऱ्याचदा आपल्याला भावना व्यक्त करतांना शब्दांची जमवाजमव करावी लागते. काहीवेळेस भावना व्यक्त करायला वेळेचा अभाव असतो तर काही वेळेस समोरची व्यक्तीच उपलब्ध नसते. अशा वेळेस लिखित मजकूर आपले कार्य चोख बजावतो. थोडक्यात , हे महत्वाचे संवाद माध्यम आहे. ज्याचे महत्तव आजच्या काळातही तितकेच टिकून आहे.
प्राचीन काळापासून हा प्रकार आपण पाहत आलो आहोत. काळानुसार त्यात बरेच बदल झाले असले तरी 'पत्रलेखन' हा विषय अजूनही विशिष्ट स्वरूपातच आपल्याला पाहायला मिळतो.
त्याच गोष्टी लक्षात ठेवून मी आपल्यासमोर पत्रलेखन करतानाचे काही प्रमुख गोष्टी, त्यांचे घटक व स्वरूप सोप्या करून मांडण्याचा प्रयास असणार आहे.
विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तयार केलेला हा आराखडा असला, तरी प्रत्येकाला पत्रलेखन करताना हे स्वरूप डोळ्यासमोर आल्यास सोपे होईल ह्याची खात्री आहे.
पत्रलेखन अनौपचारिक (मित्र - मैत्रिणी, कुटूंब, जवळचे व्यक्ती), औपचारिक(संस्था, कार्यालय किंवा विशिष्ट उद्देशाने), व्यावसायिक(मागणी पत्र, तक्रार) अशा प्रकारांची असतात.
खालील पत्रलेखन स्वरूप हा तिन्हींचा एकत्रित करून समजायला सहज असावा अशा स्वरूपाचा नमुना बनवलेला आहे. अर्थातच विद्यार्थ्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल.
अशा स्वरूपात तुम्ही पत्रलेखन पूर्ण करू शकता. विद्यार्थ्यांनी पत्रलेखन करताना कोणत्या भागाला किती गुण आणि कसे गुण विभागले असतात त्यानुसार जर अभ्यास केला तर नक्कीच पत्रलेखन प्रकारात उत्तम गुण मिळवू शकतात.
आजच्या जगात सोशल मिडीयासारखे साधने, ई-मेल, चॅटबॉक्स असे अनेक साधने उपलब्ध असली तरी, पत्रलेखन अजूनही तितकेच प्रभावी संवाद माध्यम म्हणून वापरले जाते. त्यामुळे नमुना म्हणून सादर केलेला हा पत्रलेखन प्रकार सामान्य माहिती स्वरूपात आहे. तुम्ही तुम्हाला आवडेल तसा विषयानुरूप त्यात बदल करू शकता.
- अनुप्रिया सावंत.
No comments:
Post a Comment
Thank You For Sharing Your Valuable Feedback.