हल्लीच शाळेत आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भातील मॉक ड्रिल झाली. सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच इतर सहकर्मचारी ह्यात शांतपणे पण तितक्याच जलद गतीने कृती करत होते. बरेच विद्यार्थी गोंधळलेले तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या व्यवस्थापनेसंदर्भात घरून ज्ञान प्राप्त असलेले त्यांच्याशी मॉक ड्रिल संदर्भात बोलताना आढळून आले. शिक्षक विद्यार्थी चर्चा नंतर मनात हा विचार येऊन गेला जर खरंच अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आलीच तर काय? बऱ्याच ठिकाणी ह्या मॉक ड्रिल घेतल्या जातात पण सामान्य जनतेचे काय? गृहिणीचे काय? वयस्कर लोकांचे काय? लहान मोठी मुले ज्यांना ह्या विषयावर चर्चा तर दूर पण साधी माहितीही नसते त्यांचे काय? त्यांनी काय करावे?

बऱ्याच जणांना मॉक ड्रिल हे माहित आहेच. पण वेळ आल्यावर प्रत्यक्ष घराघरात लोक त्याला कसे सामोरे जातील? किती गोंधळ होईल? विचार आलाच मनात. माझ्या प्रमाणे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असणारच तेही अनेकदा. त्याचे प्रात्यक्षिक उत्तर आजच्या 'नॅशनल सिव्हील मॉक ड्रिल' ह्या भारत सरकारच्या निर्णयाने दिला.
आज घराघरात ह्या विषयी चर्चा केली जात आहे. माहित नसलेली गोष्ट किंवा अर्धवट माहित असलेली गोष्ट दोन्ही व्यक्तीला घातकच असतात. पण त्यामुळे माहिती घेऊच नये किंवा चर्चा करूच नये हे त्याहूनही भयानक असते.
पहलगाम दहशतवादी हल्ला हा प्रत्येक भारतीयांसाठी वेदनादायक आणि तितकाच तीव्र निषेध व्यक्त करणारा आहे. आज भारतीयच नाही तर अनेक देशांमध्ये ह्या हल्लाविरुद्ध निषेध केला जात आहे.
हा निषेध फक्त निषेध म्हणून नाही तर त्याविरुद्ध आणि त्यापलीकडे आपल्या भारताने भारतासाठी घेतलेला स्टॅन्ड आहे. आणि त्याचे प्रत्युत्तर भारताने 28 सप्टेंबर 2016 चा उरी हल्ला, पुलवामा 'सर्जिकल स्ट्राईक' 26 फेब्रुवारी २०१९ आणि आज 7 मे 2025 रोजी पहलगाम येथे 'ऑपेरेशन सिंदूर' दहशतवाद्यांचा हिशोब करून घेतला गेला.
गो द्विज धेनु देव हितकारी। कृपा सिंधु मानुष तनुधारी॥
जन रंजन भंजन खल ब्राता। बेद धर्म रच्छक सुनु भ्राता॥2॥
दहशतवाद्याला धर्म हा नसतोच. ती एक विकृती आहे. आणि अशी विकृती त्यांचे पाळेमुळे खणूनच वाढत राहतात. त्यामुळे त्यांना दिले जाणारे खतपाणी(नेमके काय, कसे व कोणते?) ह्यावर एक सजग नागरिक म्हणून आपले लक्ष असणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीला खतपाणी मानसिक, भावनिक आणि आर्थिक ह्या मुख्य गोष्टीने मिळते. ह्याविषयी अधिक बोलण्यापेक्षा प्रत्येकाने मागच्या १० वर्षाच्या घडामोडी जागतिक आणि राजकीय पातळी अशा प्रत्येक घटनेचा गोष्टींबद्दल विचार करायला हरकत नाही.
सुशिक्षित अडाणी आपल्या आजूबाजूला बरेच पाहायला मिळतात जे मागचा पुढचा विचार न करता सरळ बोलून जातात, 'आपल्याला काय करायचे आहे?' 'अमुक असा नि तमुक तसा.', 'शेवटी राजकारण आहे जो तो आपली खळगी भरतो.'; एका अर्थी त्यांचे म्हणणे बरोबरच आहे, मात्र हेच राजकारण जेव्हा घराच्या उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करते तेव्हा मात्र आपण आकांडतांडव करतो.
राजकीय(राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ), न्यायाधिक , लष्करी प्रमुख आणि परकीय सत्ता चालवणारे हे सर्वच त्या-त्या देशाला प्रत्यक्ष आकार देत असतात. पूर्वापार चालत असलेली ही गोष्ट आपण ऐकत आलो आहोत, बघत आलो आहोत आणि अनुभवतही आलो आहोत.
देशाचा नेता जितका सक्षम नेतृत्व करणारा तितकाच तो देश सुरक्षित. ह्याचे प्रत्यक्ष स्वरूप आज आपण सर्वच पाहत आहोत. भारत म्हणून हिणवणारे तेच लोक आज आपल्याकडे विश्वासाच्या, मदतीच्या अपेक्षेने पाहत आहेत. हिमालयासारखी पोलादी छाती असणारा आपला 'भारत' ना कोणी जिंकू शकला ना कोणी हरवू शकला.
ज्या हाताने मदतीचा हात पुढे करता येते त्याच हाताने ह्या भारताला वेळप्रसंगी शत्रूला मुळासकट उखडूनही काढता येते.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत:
अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन परिसरात दहशतवादी घटना घडली जिथे पर्यटक पर्यटनासाठी आले होते. या भागाला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणूनही ओळखले जाते.
लहानांपासून वयस्करांपर्यंत सगळेच पर्यटनाच्या आनंदात व्यस्त असताना जो भ्याड हल्ला तिथे झाला तो निंदनीय आणि हृदयद्रावक आहे.
ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हा क्रूर खेळ खेळला, त्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने उचललेले हे पाऊल. म्हणजेच.....
श्री राम राम रणकर्कश राम राम
पाकव्याप्त काश्मीर (पोक), ज्याला पाकिस्तानमध्ये 'आझाद जम्मू आणि काश्मीर' म्हणून ओळखले जाते, हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग पाकिस्तानने कब्जा करून बळकावलेला भाग आहे.
कलम ३७० ह्या कलम अंतर्गत जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा दिला होता. भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील भागात स्थित असलेला हा काश्मीरच्या मोठ्या प्रदेशाचा भाग आहे. 1947 पासून भारत, पाकिस्तान आणि चीन यांच्यातील हा वादाचा विषय आहे.
हा कलम रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश बनला आहे. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील गुंतवणूक आणि विकास त्याच प्रमाणे तिथली जनता देखील जी आधी तिथल्या दहशतवादांच्या दबावात होती ती मुक्त झाली आहे. कारण तेथील अनेक लोकांचा असा विश्वास होता की हे कलम जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला आणि सामाजिक प्रगतीला अडथळा ठरत आहे. त्यामुळे जनमत कौल देखील कलम रद्द करण्यासाठी तितकेच महत्वाचे होतेच.
(जम्मू काश्मीर हे स्वतंत्र संस्थान आणि त्याचे महाराजा हरिसिंह असताना कलम ३७० नक्की का आणि कसे आले? ह्या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल.)
या करारानुसार पश्चिम नद्या (सिंधू, झेलम, चिनाब) पाकिस्तानला आणि पूर्व नद्या (रावी, बियास, सतलज) भारताला वाटल्या जातात. त्याच वेळी, या करारामुळे प्रत्येक देशाला दुसऱ्या देशाला वाटलेल्या नद्यांचे काही विशिष्ट वापर करण्याची परवानगी मिळते.
भारताला विशेष वापरासाठी वाटप केलेल्या पूर्वेकडील नद्यांच्या पाण्याचा वापर करण्यासाठी, भारताने खालील धरणे बांधली आहेत:
सतलजवरील भाक्रा धरण
बियासवरील पोंग आणि पांडोह धरणे आणि
रावी थीन.
हरि प्रेरित तेहि अवसर चले मरुत उनचास।
अट्टहास करि गर्जा कपि बढ़ि लाग अकास॥25॥
नोटबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राईक, कलम 370, 35A, राम मंदिर, सिंधू जल करार स्थगिती आणि आता ऑपेरेशन सिंदूर.